
सोलापूर:
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी माजी सहकार मंत्री तथा मा. आमदार श्री. सुभाष (बापू) देशमुख यांच्या वतीने उद्या, सोमवार २ मार्च २०२६ रोजी विशेष ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकांसाठी, लोकांच्या हक्काचा दरबार’ ही संकल्पना घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे.
जनतेच्या प्रश्नांवर थेट चर्चा
अनेकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. प्रशासकीय स्तरावर रखडलेली कामे असोत किंवा सामाजिक प्रश्न, यावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यात थेट संवाद असणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून आ. सुभाष बापू देशमुख यांनी या लोकसंवादचे आयोजन केले आहे. ‘संवाद आपुलकीचा… विश्वासाचा…’ या भावनेतून ते स्वतः उपस्थित राहून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.
कार्यक्रमाचा सविस्तर तपशील:
दिनांक: सोमवार, २ मार्च २०२६
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
ठिकाण: ‘अन्नपूर्णा’ १३ अ, सह्याद्री हौसिंग सोसायटी, विकास नगर, जुना होटगी नाका, सोलापूर.
सहभागाचे आवाहन
सोलापूर मतदारसंघातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या लोकसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहावे. आपल्या भागातील समस्या, वैयक्तिक अडचणी किंवा विकासात्मक कामांबाबतची निवेदने घेऊन या दरबारात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या लोकसंवादच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
